बहिणीशी प्रेमसंबधाच्या संशयातून अपहरण; शाळकरी गँगकडून कोयत्याने हल्ला …

0
42

जळगाव – येथील इंद्रप्रस्थनगरात खासगी क्लाससाठी येत असलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याचे रिक्षातून अपहरण करुन नेत मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.

प्रेम प्रकरणाच्या संशयावरून मुलीच्या नात्यातील तरुण व त्याच्या शाळकरी सवंगड्यांनी संबंधीत विद्यार्थ्यावर कोयत्याने वार करत जखमी केले.

अव्हाणे (ता. जळगाव) येथील सुमेध सुरेश सपकाळे (वय १५) हा विद्यार्थी गावातीलच स्वामी समर्थ विद्यालयात इयत्ता दहावीचे शिक्षण घेत आहे. त्याने जळगावला इंद्रप्रस्थनगरात खासगी क्लासमध्येही प्रवेश घेतलेला आहे.

त्यासाठी तो गेल्या ४-५ महिन्यांपासुन अव्हाणे ते जळगाव असा प्रवास करुन क्लासला उपस्थित राहतो. त्याच्याच वर्गात शिक्षण घेणारा सुनील एकशिंगे याच्या नातेवाईक मुलीसोबत सुमेधचे प्रेम संबध असल्याचा संशय होता. बुधवारी (ता. ४) सकाळी सुमेध सपकाळे हा क्लास संपल्यावर घरी जाण्यासाठी निघाला होता.

त्यावेळी शंभर फुटी रोडवर एका ऑटो रिक्षातून आलेल्या विजय शिंदे याने सुमेधला जबरदस्ती रिक्षात बसवुन सागरमल शाळेच्या मागील बाजुस नेले.

तेथे रोहित केशव लचकर, गौरव विलास गायकवाड, यश दिपक जाधव, रिषभ दिपक तेजी, प्रथमेश सुनील एकशिंगे या टोळक्याने लाथाबुक्यांनी तुंबळ हाणामारी केले. तसेच, रोहित याने त्याच्याजवळील धारदार कोयत्याने हल्ला करून सुमेधच्या कोपरावर गंभीर दुखापत केली.

उपचारानंतर तक्रार..

सुमेध सपकाळे याला मारहाण होत असताना यश दिनेश अंबुरे याने सुमेधची सुटका करुन घरी सोडले. रक्तबंबाळ अवस्थेत सुमेधला त्यानंतर जिल्‍हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार पूर्ण झाल्यानंतर गुरूवारी (ता. ५) सुमेधने दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Spread the love