मुंबई: कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे राज्यात भीतीचे वातावरण आहे. ओमायक्रॉनमुळे कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. दरम्यान कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारी घेतली जात असून लसीकरण मोहीम देखील वेगाने सुरू आहे.राज्यात 15 ते 18 वयोगटातील 60 लाख मुलांचं लसीकरण करायचं आहे. मुलांनी कोरोना लस घेतली नाहीतर पिझ्झा बर्गर देखील मिळणार नाही, असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.
15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण वेगानं करत आहोत. राज्यातील 60 लाख मुलांचं लसीकरण करायचं आहे. दररोज 3 लाख मुलांचं लसीकरण याप्रमाणं प्रयत्न करत आहोत. 15 ते 20 दिवसांमध्ये हे लसीकरण होऊन जाईल. किशोरवयीन मुलांना स्वत: सुरक्षित राहायचं असेल तर कुठं जायचं असेल तर लसीकरण करुन घ्या. बर्गर आणि पिझ्झा घ्यायचा असला तरी लस बंधनकारक त्यामुळं लसीकरण करुन घ्या, असं आवाहन राजेश टोपे यांनी किशोरवयीन मुलांना केलं.












