महावितरणकडे नऊ महीन्यांपुर्वी तक्रार देवुन ही जंगलागलेले विद्युत खांब बदलेले जात नाही अप्रिय घटनेची शक्यता

0
34

दिपक नेवे

यावल येथील मेन रोड वरील गवत बाजार परितरातील भाजी बाजार या ठीकाणचे सार्वजनिक विद्युत पुरवठा करणारे इलेक्ट्रिक पोल जंगल्यामुळे खालच्या बाजूला खराब होऊन खूप झुकला आहे व रस्त्याच्या टर्निंग वर असल्याने वाहनांचा धक्का लागून केव्हाही पडू शकतो तसे झाल्यास मोठी जिवीत व वित्तीय हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही , यासंदर्भात तक्रार केल्यावर देखील महावितरण कंपनीचे या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे . या संदर्भातील मिळालेली माहिती अशी की यावल शहरातील मुख्य बाजारपेठेतील गवत बाजार हे क्षेत्र भाजीपाला विक्रीसाठी प्रसिद्ध आहे यामुळे या परिसरात नागरीकांची नेहमीच वर्दळ असते , याच ठीकाणी मेन रोडवरील वळणावर सार्वजनिक विद्युत पुरवठा करणारा विद्युत खांब हा पुर्णपणे जंगलागल्याने जिर्ण झाला असुन तो कुठल्याही क्षणी कोसळण्याची भिती या परिसरातील नागरीकांमध्ये व्यक्त करण्यात येत असून , याबाबत त्या वळणावर रहीवाशी असलेले उच्च शिक्षीत तरूण अनिल त्र्यंबक पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना वारंवार तोंडी सुचना देवुन व दिनांक १७ /११ / २०२० रोजी यावल येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता यांना लिखित तक्रार अर्ज दिला असतांना ही मागील नऊ महीन्यांपासुन या संदर्थात अद्याप महावितरण विभागाच्या वतीने कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही . या मार्गावरील विद्युत खांबाच्या ठीकाणी जवळपास रोज भाजी बाजार भरत असतो व ती खरेदी करण्यासाठी नागरिकांची व वाहनांची खूप मोठी गर्दी असते.जर हा जिर्ण झालेल्या सार्वजनिक विद्युत पुरवठा करणार खांब पडला किंवा मोटर वाहनाने धडक देवुन कोसळल्यावर खूप मोठी जीवित व आर्थिक हानी होऊ शकते असे तक्रारीत म्हटले आहे.महावितरणच्या कार्यालयामध्ये रितसर तक्रार करूनसुद्धा जंगलागुन जिर्ण झालेले बदलला गेला नाही.भविष्यात जर काही अप्रिय घटना घडल्यास त्यास सर्वस्व महावितरण कंपनी जबाबदार राहील.तरी यावलच्या महावितरण. विभागाने या संदर्भात गांभीर्याने दखल घेवुन तात्काळ या ठीकाणचे जिर्णखांब बदल करावा असे म्हटले आहे .

Spread the love