नांदेड शहरात दहशत कमी करायची असेल तर या गुन्हेगारांचा एन्काउंटर झाला पाहीजे. अॅड. दिलीप ठाकूर.

0
72

प्रतिनिधी : शिवानंद उप्पे.

नांदेड –  येथे काल झालेल्या बांधकाम क्षेत्रातील मोठे व्यावसायिक संजय बियाणी यांची भर दिवसा हत्त्या करणे म्हणजे नांदेड येथील व्यावसायीक क्षेत्राला मोठा धक्काच बसला आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येमुळे नांदेड शहरात जी दहशत निर्माण झाली आहे ती कमी करायची असेल तर संजय बियाणी यांच्या मारेकऱ्यांचा एन्काउंटर करावा अशी मागणी भाजपा जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी केली .

दिवसाढवळ्या झालेल्या बियाणी यांच्या हत्येमुळे सर्वसामान्य व्यापारी तसेच प्रतिष्ठित उद्योजक हादरले आहेत.नांदेडचा बिहार होतो की काय अशी भावना नागरिकांमध्ये पसरली आहे.या हत्तेमुळे खंडणीचे प्रकार आणखी वाढतील आणि जीवाच्या भीतीपायी अनेक जण गुपचूप खंडणी देतील.त्यामुळे शहरात निर्माण झालेली दहशत व सर्वसामान्य नागरिकांची भीती कमी करायची असेल तर पोलिसांनी आरोपींना त्वरित अटक करावी. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमाणे पोलिसांना पूर्ण सूट द्यावी. हैदराबाद पोलिसांनी बलात्कार करणाऱ्यांचा एन्काउंटर केल्यामुळे त्यानंतर सामूहिक बलात्कार झाले नाहीत. त्याचप्रमाणे जर संजय बियाणी यांच्या मारेकऱ्यांचा एन्काऊंटर केला तर अशाप्रकारे हत्या करण्याची हिंमत भल्याभल्या गुंडांची होणार नाही. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात वरील प्रमाणे कारवाई करावी अशी मागणी दिलीप ठाकूर यांनी केली आहे.

Spread the love