झुरखेडा येथे महास्वराज योजनेअंतर्गत लोकसहभागातून शेतकऱ्यांसाठी झुरखेडा ते दुसखेडा शेतरस्ता खुला करण्यात आला.

0
46

धरणगाव:- तालुक्यातील झुरखेडा येथे मागील पंधरा वर्षांपूर्वी भीषण पाणी टंचाईवर मात करणेसाठी झिरी नदीवर तीन बंधाऱ्यातून हजारो ब्रास गाळ काढून नदी खोलीकरण करण्याचे काम करण्यात आले. या कामात गावातील नोकरीनिमित्ताने बाहेरगावी राहणारी लोकं सर्व गावतील नागरिकांना एकजूट करण्यात आले  याचे सर्व  गावकरी साक्षी आहेत परंतु त्यातील एक बंधारा दुसखेडा गावाजवळ  बांधल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे हाल होवू लागले. पर्यायी रस्ताही खूपच अडचणीचा ठरत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढाकार घेवून स्वतःच्या सामाईक बांधारावरून रस्त्यासाठी शेतजमीन देणे गरजेचे आहे. असे प्राधान्य देऊन  गावातील सुरेशआप्पा पवार (पाटील) सामाजिक कार्यकर्ते यांना सांगितले त्यानंतर त्यांनी सर्व शेतकऱ्यांना एकत्र आणून हे काम सुरू करण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली या कामासाठी प्रत्येक शेतकऱ्याला भेटून त्यांची संमतीसाठी स्वाक्षऱ्या घेतल्या आणि ते प्रकरण मा तहसीलदार नितीनकुमार देवरे धरणगाव यांच्याकडे ०३ मार्च २०२२ रोजी दाखल करण्यात आले. त्यानंतर मग मा तहसीलदार यांच्या सहकार्याने दि. २१ जून रोजीच्या पत्रांनवे जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार महाराष्ट्र शासनाच्या महास्वराज्य अभियानातंर्गत लोकसहभागातून होणाऱ्या झुरखेडा ते दुसखेडा शेत रस्त्याचे मंडळाधिकारी व प्रभारी तलाठी यांना रस्ता मोजणी करून मोकळा करून देण्याचे आदेश देण्यात आले त्यानंतर मग मंडळाधिकारी व प्रभारी तलाठी यांनी दि.२३ जून रोजी त्यांच्याकडून प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करून मोजणी करत  रस्ता मोकळा करून स्थळपंचनामा देखील करण्यात आला. असुन झुरखेडा येथील सोळा शेतकऱ्यांनी सामंजस्यातून शिवार रस्त्यासाठी प्रशासनास सहकार्य करत स्वतःच्या सामाईक बांधाच्या मध्यभागापासून एकिकडे पाच फूट तर दुसरीकडे पाच फूट असा मिळून एकूण दहा फुटाचा रस्ता देण्यास शेतकऱ्यांकडून मान्यता देण्यात आली झुरखेडा ते दुसखेडा शेत रस्ता हा प्रामुख्याने शेतीच्या व दुसखेडा गावात जाण्याकरीता भविष्यात आवश्यक साधनांची ने आण करण्याकरीता उपयोग करता येईल . यांत्रिकी करणामुळे शेतीमध्ये पेरणी आंतरमशागत , कापणी , मळणी यासारखी कामे यंत्रामार्फत करण्यात येतात. अशा यंत्र सामग्रीची वाहतूक करण्याकरिता पावसाळयातही शेत , पाणंद रस्ते सुयोग्य असणे काळाची गरज आहे . यासाठी जिल्हाधिकारी यांचे निर्देषानुसार महाराष्ट्र शासनाच्या महास्वराज्य अभियानातंर्गत लोकसहभागातून ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मा तहसिलदार नितीनकुमार देवरे यांच्या आदेश्याद्वारे  सांगण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मंडळाधिकारी बोरसे भाऊसाहेब, प्रभारी तलाठी, झुरखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेशआप्पा पवार (पाटील) भागवत चौधरी, गोरख पाटील, अशोक चौधरी, सुनील चौधरी, कैलास चौधरी, सुभाष चौधरी,अजय चौधरी, लिलाधार चौधरी, दिपक चौधरी, दिनेश चौधरी, गणेश पाटील, प्रमोद चौधरी, सुनील चौधरी, प्रमिलाबाई चौधरी, नामदेव कोळी व आदी शेतकरी बांधव उपस्थित होते .

आता ह्या रस्त्याची रितसर मोजणी करून रस्ता मोकळा करण्यात आला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप आनंदाचे वातावरण आहे.

Spread the love