दिपक नेवे
यावल येथील शहरातील बाजारपेठ असलेल्या व वर्दळीच्या ठिकाणी वाल्व नादुरुस्त झाल्याने ते सर्व वॉल्व मधुन या ठीकाणी पाण्याची नासाडी होत आहे याचं उत्तर गुरुवारी पहावयास मिळालं गुरुवारी पाण्याची नासाडी झाल्याने ते पाणी तुंबले असता याकडे नगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी शहरातील सुज्ञ नागरीक व काही समाजसेवकांनी नगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी त्या पाण्यात कागदी नाव तयार करून ते सोडलेयामुळे आता तरी नगरपालिकेने तात्काळ याची दखल घेत व्हॉल दुरुस्त करण्याचे काम सुरू केले आहे .शहरातील मेन रोड मुख्य बाजार पेठवॉल नादुरुस्त झाल्याने पाण्याची नासाडी होत होती या ठीकाणी पाण्याची गळतीमुळे अशुद्ध पाणी नळाव्दारे नागरिकांच्या घरात येत होते त्यामुळे शहरात जल जन्य रोगाची भीती निर्माण होण्याचे चिन्ह होते ,यामुळे संतप्त झालेल्या झालेल्या नागरिकांनी गुरुवारी या साचलेल्या पाण्यात कागदाचे नाव तयार करून नगरपालिकेचे लक्ष वेधले व निषेध केला या विषयाची संपूर्ण दिवसभर ही चर्चा चांगलीच रंगली यामध्ये प्रहार संघटनेच्या वतिने मनोज रामदास करकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदनही देण्यात आले निवेदनावर गणेश वाणी, धनंजय सराफ, महेश वाणी . बाळकृष्ण कस्तुरे ,अनिल वारुडकर ,अरुण बारी, गोपाळ वाणी, नितीन रणधिरे ,संदीप बारी आदी उपस्थित होत
यावल शहरातील मुख्य बाजारपेठेतील व्हॉल नादुरूस्तीमुळे पाण्याची नासाडी नगर परिषदचे लक्ष वेधण्यासाठी लावली वेगळी शकल