भारताच्या स्वातंत्र्यावर केलेल्या वक्तव्याविरोधात AAP ची तक्रार दाखल

0
48

मुंबई-भारताला २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि १९४७ मध्ये मिळालेली ‘भिक्षा’ अशी टिप्पणी केल्याबद्दल चित्रपट अभिनेत्री कंगना राणावतच्या विरोधात खटला दाखल करण्याची मागणी आम आदमी पक्षाने गुरुवारी मुंबई पोलिसांकडे केली.

AAP च्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रीती शर्मा मेनन यांनी या टिप्पणीला “देशद्रोही आणि प्रक्षोभक” म्हणून संबोधले. 1947 चे भारताचे स्वातंत्र्य “भीक” होते, वास्तविक स्वातंत्र्य नव्हते, असा दावा करून राणावत यांनी केलेल्या अपमानास्पद विधानाचा AAP तीव्र निषेध करते, असे मेनन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले

Spread the love