ऐनपूर महाविद्यालयातील प्रा.प्रदिप तायडे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय पारितोषिकाने सन्मानित.

0
40

रावेर प्रतिनिधी–राजेंद्र महाले– तालूक्यातील ऐनपूर महाविद्यालयातील *प्रा.श्री प्रदिप नामदेवराव तायडे* या़ना दि.१९ जुन २०२२ रविवारी सकाळी दहा वाजता नहाटा महाविद्यालय भुसावळ येथे शहिद भगतसिंग फाऊंडेशन भुसावळ यांच्या तर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्याची ऊर्जाक्षरे राज्यस्तरीय निंबध स्पर्धेत द्वितीय क्रमाकांच्या पारितोषिकाने सपत्निक सन्मानित करण्यात आले.स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

राष्ट्रपिता महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व त्यांच्या शैक्षणिक विचारांची वर्तमानात आवश्यकता हा निबंध स्पर्धेचा विषय होता.आजच्या तरूणांमध्ये वाचन व लेखनाची आवड निर्माण व्हावी तसेच महापुरूषाचे विचार व कार्य कळावे या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वासुदेव वले हे होते.प्रमुख पाहुणे म्हणुन भालोद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वर्षा नेहेते मॅडम उपस्थित होत्या.ज्येष्ठ समाजसेवक मा.श्री.रघुनाथ अप्पा सोनवणे, प्रागतिक विचारमंचचे अध्यक्ष मा.श्री.जे.पी.सपकाळे सर, नॉलेज सेंटर भुसावळच्या संचालिका मा.वंसिका मॅडम, प्रा.डॉ.जयेंद्र लेकुरवाळे सर , प्रा.डॉ.दिनेश पाटील सर, मा.प्रा.डॉ.जतिन मेढे सर, शहिद भगतसिंग फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.निलेशजी रायपुरे सर तसेच विजेते , सहभागी स्पर्धक व पालक उपस्थित होते.

Spread the love