काँग्रेसचेही नऊ आमदार फुटणार? प्रश्न विचारताच आदित्य ठाकरे म्हणाले, “आपण आत्ता…!”

0
47
शिवसेनेनंतर आता काँग्रेसचेही नऊ आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याच्या आणि काँग्रेस फुटणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याबाकाँग्रेसचेही नऊ आमदार फुटणार? प्रश्न विचारताच आदित्य ठाकरे म्हणाले, “आपण आत्ता…!”बत पत्रकारांनी शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारला. त्यावर आदित्य ठाकरेंनी आपण आत्ता जर-तरवर बोलण्यापेक्षा देवाचं दर्शन घेऊ, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते शुक्रवारी (२ सप्टेंबर) मुंबईतील चंदनवाडीच्या गणपतीच्या दर्शनाला आले असताना माध्यमांशी बोलत होते.

काँग्रेसचे नऊ आमदार फुटणार असल्याच्या चर्चांवर प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले, “जाऊ दे ना, आपण आत्ता जर-तर, अगर-मगरपेक्षा देवाचं दर्शन घेऊ आणि त्या आशीर्वादाने पुढे जाऊ.”

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला दोन महिने झाले आहेत. या सरकारला किती गुण द्याल? असा प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले, “मी उत्सवाच्या दिवशी मी राजकारणावर बोलत नाही. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. त्यामुळे त्यावर काहीही बोलणार नाही.”

गणेशोत्सवातील राजकारणावरही त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, “उत्सवाच्या काळात जो कुणी राजकारण करत असेल तो बालिशपणा आहे. लोकांना हे सगळं दिसत आहे. एवढं राजकारण झालं तर लोकांना राजकारणाचा कंटाळा येईल. कोविडच्या दोन वर्षांच्या काळानंतर आता सणवारांचा आनंद घेत आहेत. त्यामुळे राजकारण बाजूला ठेऊन लोकांना याचा आनंद घेऊ

“काही पक्षांकडून सगळीकडे राजकारण होत आहे. हे लोकांना दिसत आहे. ते कुणालाही आवडत नाही. आज आपण गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेत आहोत. हे सगळं त्यांच्या आशीर्वादावरच चाललं आहे,” असं ठाकरे यांनी म्हटलं.

Spread the love