महाराष्ट्र राज्यातील सर्व पत्रकारांना टोलमाफी -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याची घोषणा….

0
35

मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत उभारण्यात आलेल्या टोलनाक्यांवर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी, त्याचप्रमाणे या  महामार्गावरून प्रवास करताना अपघात होऊन मृत्यू आल्यास विमा कवच देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली सिंधुदुर्गातील आजी – माजी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागणीस अनुसरून गडकरी यांनी संपूर्ण राज्यासाठीच हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले.

त्यामुळे राज्यातील पत्रकारांना आजपासुन टोलमुक्त प्रवासाची संधी  उपलब्ध होणार आहे. आमदार , खासदार , मंञी, स्वातंत्र्यसेतिक यांच्याप्रमाणे पत्रकारदेखील समाजासाठी झटत असतात.

सर्वस्व देत असतात जीव धोक्यात घालत असतात. पञकार हा लोकशाहीचा चौथा आधार  स्तंभ म्हणून, ओळखला जातो. या पत्रकाराला त्याची सेवा बजावत असताना वारंवार राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे राष्ट्रीय  महामार्गावरील टोलनाक्यावर आपणास टोलमाफी मिळावी, या मागणीसाठी सिधुदुर्गातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली थेट केंद्रीय  रस्ते, वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.

विलीनीकरणाच्या १ वर्षानंतर  राष्ट्रउभारणीमध्ये महत्वाची भूमिका निभावन्यासाठी पी एन बी  २.० झाली अधिक समर्थ या भेटीवेळी  सुरेश प्रभु यांनी सिंधुदुर्गातील पञकारांची मागणी कशी रास्त आहे हे गडकरींना पटवून दिल्यानंतर केवळ सिंधुदुर्गातील पञकारच नव्हे, तर राज्यातील सर्व पञकारांना टोलमाफी करीत असल्याची घोषणा गडकरी  यांनी केली व तसे आदेश  काढण्याच्या सुचना सचिवांना दिल्या.

त्याचप्रमाणे आपल्या या महामार्गावर जर कुणा पञकाराचा अपघाती मृत्यू झाला, तर त्याला पाच लाखाचा विमा देण्याची घोषणाही गडकरी  यांनी यावेळी  केली.. तसेच ही सवलत फक्त अधिस्विकृती धारक पञकारांनाच नव्हे , तर सरसकट सर्वच पत्रकारांना देण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

Spread the love